सामान्यांचा आवाज, शेतकर्‍यांचा प्रतिनिधी डोंगरकिनी जिल्हा परिषद निवडणूकीत सरपंच आप्पासाहेब येवले नावाच्या चर्चेने विरोधकांला वाटायला लागली भिती

 

पाटोदा (प्रतिनिधी) डोंगरकिन्ही जिल्हा परिषद गटात सध्या एक नाव जनतेच्या चर्चेत आहे ते म्हणजे युवा सरपंच आप्पासाहेब येवले. पारंपरिक राजकारणाच्या पलीकडे जाऊन कार्याच्या बळावर जनतेच्या मनात स्थान निर्माण करणारे, शेतकर्‍यांच्या वेदना समजून घेणारे आणि सर्व सामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.आप्पासाहेब येवले हे मूळचे शेतकरी कुटुंबातून आलेले असून, ग्रामीण जीवनशैली, अडचणी आणि गरजा त्यांना लहानपणापासून ज्ञात आहेत.
त्यांनी डोंगरकिन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर काम करत असताना गावात पायाभूत सुविधा, स्वच्छता, जलव्यवस्थापन, महिला बचतगट सक्षमीकरण, तरुणांसाठी रोजगार व प्रशिक्षण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात ठोस पावले उचलली. प्रामाणिकपणा, पारदर्शक कारभार आणि सर्व समावेशक निर्णयप्रक्रिया या तत्त्वांमुळे त्यांनी अल्पावधीतच लोकांचा विश्वास संपादन केला असल्यामुळे डोंगरकिन्ही परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये राजकारण हे काही मोजक्या घराण्यांपुरतेच मर्यादित राहिले आहे. मात्र, सध्याच्या घडीला गावा गावातील युवक, शेतकरी, महिला आणि गोरगरिब वर्गात एक सूर उमटतोय ‘आता आपला माणूस जिल्हा परिषदेवर पाहिजे! या पार्श्वभूमीवर आप्पासाहेब येवले यांचं नाव केवळ चर्चेपुरतं मर्यादित न राहता, आता जनतेच्या अपेक्षांचं आणि विश्वासाचं प्रतीक बनत चाललं आहे.त्यांचं कार्य पाहता, अनेक राजकीय जाणकार देखील मान्य करतात की, या भागाला काम करणारा, बोलणारा नव्हे अशा नेतृत्वाची गरज आहे. आणि आप्पासाहेब येवले हे या सगळ्या गुणांची सांगड घालणारे व्यक्तिमत्त्व आहे.आतापर्यंत निवडणुकांमध्ये पैसा,जातीय समीकरणं आणि बाह्य प्रभाव यांचाच जोर राहिला आहे. पण आप्पासाहेब येवले यांनी या सगळ्याला फाटा देत फक्त जनतेच्या प्रेमावर आणि कामगिरीवर आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच अनेक पैशाच्या जोरावर निवडणुकीच्या तयारीत असणार्‍या इच्छुकांना हा तरुण नेतृत्व चर्चेत येत असल्यामुळे मोठा धक्का ठरत असून आप्पासाहेब येवले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) कार्यकर्ते असून, त्यांनी ग्रामस्तरावर पक्षाला मजबूत आधार दिला आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतोय की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या या कार्याची दखल घेईल का?’ स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांपासून तरूण मतदारांपर्यंत एकच मागणी ऐकू येते – ‘आप्पासाहेब येवले यांना जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी द्यावा
या गटातील अनेक ग्रामस्थांनी आपल्या प्रतिक्रिया देताना म्हटले की: गावपातळीवर ज्याने आम्हाला अडचणीच्या काळात आधार दिला, रस्ते, पाणी, शौचालय यासारख्या मूलभूत गोष्टींसाठी लढा दिला, त्यालाच आम्ही मोठ्या व्यासपीठावर पाठवणार.’आप्पासाहेब येवले यांचे नाव सध्या सोशल मीडियावर, गावपातळीवरील चर्चांमध्ये आणि कार्यकर्त्यांच्या गटांमध्ये अगदी उघडपणे घेतले जात आहे. कारण राजकारणात काम करणार्‍यांपेक्षा काम दाखवणार्‍यांची गरज आहे. आप्पासाहेब येवले यांनी त्यांच्या कार्यातून ही पात्रता सिद्ध केलेली आहे. त्यामुळे डोंगरकिन्ही जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीत त्यांची उमेदवारी नक्कीच चर्चेचा विषय ठरत असून, आशेचा किरण मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *